src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

रविवार, 23 अक्तूबर 2016

लाइक मी फोटो एंड शेयर जिसको भी इसके बारे में जानकारी हो आपने कमेंट में भेज सकते हो अनार की लागवड कैसे करते हैं और अच्छी तरह से खेती कैसे तैयार करते हैं इस पेज में आपको हम बता रहे

🌾होय आम्ही शेतकरी®🌾

💢डाळिंब एकात्मिक खत व अन्नद्रव्य व्यवस्थापण💢

- श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर

🅾 रासायनिक खतांचा जास्त वापर म्हणजे जास्त उत्पादन असे समीकरण शेतकरी बंधू मानतात परंतु जमिनीची काळजी न घेता रासायनिक खतांचा अतिरेक वापर हा हानिकारक असू शकतो, त्यामुळे डाळिंब रोगास जास्त बळी पडू शकतो. त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे माती परीक्षण करून एकात्मिक खत व अन्नद्रव्य व्यवस्थापण करणे अतिशय गरजेचे आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन डाळिंब एकात्मिक खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापण हा लेख लिहित आहोत...

🅾डाळिंब पिकाला आपली भूक भागवण्यासाठी १७ अन्नद्रव्याची, सेंद्रिय खतांची आणि जिवाणू खतांची  गरज असते व ते संतुलित पद्धतीने म्हणजे डाळिंब पिकाला ज्या अवस्थेमध्ये, ज्या अन्नद्रव्याची, ज्या प्रमाणात, ज्या स्वरूपात गरज आहे ते उपलब्ध करून देणे होय...

🅾खते वापरताना घ्यावयाची काळजी...

👉कोणतेही कॅल्शिअमयुक्त खतामध्ये सुल्फेटयुक्त खते मिसळू नये, मिसळल्यास जिप्सम तयार होतो व तो सुल्फेट व कॅल्शिअम उपलब्ध होऊ देत नाही...

👉कोणत्याही फॉस्फरसयुक्त खतांमध्ये कॅल्शिअम व मिक्रोनुट्रिएन्टयुक्त खते मिक्स करू नये...

👉चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअमयुक्त खते टाकू नये... उदा. जिप्सम, कॅल्शिअम क्लोराईड, कॅल्शिअम नायट्रेट.

श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर

🅾पाणी तोडणे व पानगळ करते वेळी घ्यावयाची काळजी...

👉डाळिंबाचा बहार धरण्यापूर्वी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे झाडाला ताण देणे किंवा विसावा देणे. जर जमिनीत व झाडात कर्ब : नत्र गुणोत्तर १० ते १२: १ असेल तर येणारी फुले गुच्छ स्वरूपात किंवा झुपक्याने येतात, मादी व नराचे शेकडा प्रमाण ७०: ३० योग्य असते. त्यामुळे चांगले परागीभवन होते. त्यासाठी ताण काळात जोपर्यंत झाडे कार्यक्षम व हिरवीगार असताना म्हणजे पानांची कर्ब ग्रहनाची क्रिया चालू असते. त्यावेळी ५ ग्रॅम ०० : ५२ : ३४ व ५ मिली मल्टी मिक्रोनुट्रिएन्ट प्रति लिटर पाणी असा फवारा घ्यावा, हि फवारणी ताण काळात दोन वेळेस घ्यावी...

👉पाण्याचा ताण हलक्या जमिनीत ३५ ते ४५ दिवस तर भारी जमिनीत ४५ ते ६० दिवस पाणी बंद करावे...

👉डाळिंबाला कमीतकमी नैसर्गिक ताण बसणे महत्वाचे, म्हणजे ५ % पर्यंत आतील जुने पाने गळणे व पूर्ण शेंड्याची वाढ थांबणे होय. परंतु या अवस्थेच्या पूर्वी जर पानगळ केली तर फुलांऐवजी शेंडे निघतात व सेटिंग लांबते, म्हणून वरील प्रमाणे नैसर्गिक पानगळ झाल्यानंतर इथ्रेल चा स्प्रे घ्यावा...

👉इथ्रेल ऐवजी इतर कोणतेही ससायनाने पानगळ करू नये, फवारणी नंतर कमीत कमी ८० % पानगळ होणे आवश्यक असते, ८० ते १०० % पानगळ झाल्यावर लगेच पाणी चालू करावे...

👉इथ्रेल चा वापर नैसर्गिक पानगळ किती झाली त्यापद्धतीने कमी जास्त करून १ ते २.५ मिली प्रति लिटर व त्यात ०० : ५२ : ३ @ ५ ग्रॅम प्रति लिटर टाकून फवारणी सायंकाळी करावी कारण दुपारी पानांचा 'स्टोमाटा' बंद असतो...

श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर

👉जमिनीची आडवी उभी नांगरणी करून झाडालगतची जमीन चाळून घ्यावी...

👉पानगळ करण्याअगोदर १ % व  पानगळ झाल्यानंतर ०.५ % बोर्डो मिश्रणचा छाटणी करून स्प्रे घ्यावा...

श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर

🅾 पाणीच्या ताणानंतर पहिले पाणी देण्याअगोदर बेसल डोस खालील पद्धतीने द्यावा...

👉 १० किलो  शेणखत + १ किलो व्हर्मीकंपोस्ट + ५०० ग्रॅम निंबोलीपेन्ड प्रति झाड जेथे ड्रीपर चे पाणी पडते तेथे खड्डा करून भरावे व त्यावर १५० ग्रॅम डीएपी + १०० ग्रॅम एमओपी + १०० ग्रॅम युरिया + १०० ग्रॅम मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट + १० ग्रॅम बेनसुल्फ प्रति झाड टाकावे व वरून पालापाचोळा टाकून आच्छादन करावे...

🅾 डाळिंब पिकाला स्लरिचा वापर (अती महत्वाचे)...

⭕खालील तिन्ही स्लरींचा वापर २ महिन्यातून एकदा असा कमीतकमी तीन दा करावा, त्यामध्ये पहिले पाणी दिल्यानंतर ० ते ४५  दिवसांमध्ये एकदा, ४५ ते ९० दिवसांमध्ये एकदा व ९० ते १२०  दिवसांमध्ये एकदा करावा...

१. जिवाणू खते स्लरी

२० किलो शेणखत + १० लिटर गोमुत्र + २ किलो काळा गूळ + ५०० ग्रॅम ऍझोटोबॅक्टर + ५०० ग्रॅम फॉस्फेट सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम + ५०० ग्रॅम पोटॅश सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम + १ लिटर एएम २ द्रावण + ३०० लिटर पाणी.

२. जिवाणू बुरशीनाशके स्लरी...

२० किलो शेणखत + १० लिटर गोमुत्र + २ किलो काळा गूळ + १ किलो ट्रायकोडर्मा + १ किलो स्पिडोमोनास  + १ लिटर स्पासिलोमायसीज  + ३०० लिटर पाणी.

श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर

३. सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी...

२० किलो शेणखत + १० लिटर गोमुत्र + २५ किलो  निंबोलीपेन्ड + ५ किलो झिंक सुल्फेट + ५ किलो फेरस सुल्फेट + ५ किलो मॅग्नेशिअम सुल्फेट + १ किलो बोरॉन + ३०० लिटर पाणी.

⭕वरील तिन्ही स्लरी आधी १०० ते १५० लिटर पाण्यात बनवून ५ ते ६ दिवस सावलीत ठेवायची, दररोज २ मिनिट हलवायची किंवा चांगली मिक्स करायची व ७ व्या दिवशी उरलेले पाणी त्यात टाकून वापश्यावर जमिनीत पिकास आळवणी म्हणजे ड्रिंचिंग करावी साधारणतः १ लिटर प्रति झाड, एक एकर साठी...

⛔ टिप.. शक्यतो जिवाणू खते स्लरी आणि जिवाणू बुरशीनाशके स्लरी एकत्र करू नये व वरील स्लरी वापरताना दोन स्लरीनमध्ये कमीत कमी २ दिवसाचे आंतर ठेवावे...

श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर

🚫 ड्रीप द्वारे विद्राव्य खतांचा वापर...

👉पहिले पाणी दिल्यानंतर ० ते ३० दिवसापर्यंत १२ : ६१ व १३ : ४० : १३ दोन्ही मिळून ४ किलो पर एकर ५ दिवसाच्या आंतराने ५ वेळेस द्यावे...

👉पहिले पाणी दिल्यानंतर ३० ते ६० दिवसापर्यंत १३ : ४० : १३ व ०० : ५२ : ३४ दोन्ही मिळून ४ किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने ५ वेळेस द्यावे...

👉पहिले पाणी दिल्यानंतर ६० ते ९० दिवसापर्यंत ०० : ५२ : ३४ व १३ : ०० : ४५  दोन्ही मिळून ४ किलो पर एकर ५ दिवसाच्या आंतराने ५ वेळेस द्यावे...

👉पहिले पाणी दिल्यानंतर ९० ते १२० दिवसापर्यंत पोटेशिअम सोनाईट व  ०० : ५२ : ३४ दोन्ही मिळून ४ किलो पर एकर ५ दिवसाच्या आंतराने ५ वेळेस द्यावे...

👉पहिले पाणी दिल्यानंतर १२० ते १५० दिवसापर्यंत ३ किलो पर एकर ०० : ०० : ५० ५ दिवसाच्या अंतराने ५ वेळेस द्यावे...

👉कॅल्शिअम नायट्रेटचा वापर ५ किलो पर एकर ड्रीपद्वारे किंवा ५ ग्रॅम प्रति लिटर फवारणीद्वारे २ महिन्यातून एकदा गरजेनुसार करावा...

श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर

🚫ड्रीप द्वारे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर...

👉पहिले पाणी दिल्यानंतर ० ते ४५, ४५ ते ९० आणि ९० ते १२० दिवसामध्ये ३ वेळेस ३ लिटर पर एकर चिलेटेड मिक्स/मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट द्यावे...

🚫फवारणीद्वारे खत मात्रा...

👉फुले येण्यापूर्वी २ ग्राम प्रती लिटरने चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्टचा स्प्रे घ्यावा...

👉फुलगळ होत असेल तर २ प्रती लिटरने बोरॉनचा स्प्रे घ्यावा...

👉५० % फुले आल्यानंतर २ ग्राम प्रति लिटर ने चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट व ५ ग्राम प्रति लिटर १२ : ६१ चा दुसरा स्प्रे घ्यावा...

👉फळ तोडण्यापूर्वी १० दिवस ५ ग्राम प्रति लिटर पोटेशिअम सोनाईटचा स्प्रे घ्यावा...

अधिक माहितीसाठी संपर्क -
✍🏿श्री. ओमप्रकाश यशवंत हिरे
पी. एच. डी. विद्यार्थी
मृद विज्ञान आणि कृषि रासायनशास्त्र
म. फु. कृ. वि. राहुरी
📞7588015491आणि 

श्री. राजू गाडेकर
कृषि सल्लागार (एम. एस. सी. भाजीपालाशास्त्र
📞7709490777

कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ. वरील माहिती वाचून, संकलन करून ती लेखाच्या स्वरूपात मांडत असतो... त्या लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना आपल्या कायद्यात "इंटेलेक्चुअल प्रोपर्टी राईटस् (Intellectual Property rights)" या रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे... तेव्हा कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना, लेखाला स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना काळजी घ्या... मूळ लेखक कॉपीराईट (Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ. कलमांखाली आपल्यावर कारवाई करू शकतो... या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या प्रकारची शिक्षा होवू शकते... आपणांस वाटते तेवढे हे सर्व सोपे नाही... मूळ लेखकाचे नाव रिमूव करून, स्वतःचे नाव टाकून मेसेज पुढे पाठवू नका...

|| अन्नदाता सुखी भवः ||

अधिक माहितीसाठी आपले फेसबुक पेज लाईक करा 

🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866

कोई टिप्पणी नहीं: