src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

गुरुवार, 27 अक्तूबर 2016

Like me photo and share comment Kaluram

Like me photo and share only Maratha and comment

Like on post

Delighted to be in Vadodara. This picture was taken during the inauguration of  the new integrated terminal building of Vadodara Airport.

Like on post

A great gift for the citizens of Vadodara…the new terminal building is a big boost to the city’s infrastructure.

Like on post naredra modi sar

I will talk about our efforts to mitigate climate change with David Letterman. Tune in tonight at 10pm on National Geographic Channel

Like on post Barrera modi sar

I will talk about our efforts to mitigate climate change with David Letterman. Tune in tonight at 10pm on National Geographic Channel

Barrera midi like on post and share

Landed in Khajuraho. Will go to Mahoba, where I will address a public meeting and later visit Varanasi to inaugurate key development projects.

Narendra Modi like on a post and share

Giving examples of Rurban Mission & Vanbandhu Kalyan Yojana, talked on steps taken by Centre for overall empowerment of tribal communities.

Our tribal communities have shown the way when it comes to living in harmony with nature & conserving our forests.
http://nm-4.com/e8hy

Narendra Modi like on post

Warm welcome to PM John Key, who is visiting India. I am sure his visit will further cement India-New Zealand ties.

Narendra Modi like post

Happy to welcome PM John Key for a bilateral visit & hold talks on India-NZ ties.

Like on post Narendra Modi


Both PM John Key & I recognise the need for more economic engagement between India & NZ particularly in food processing, dairy & agriculture.

At a time where terrorism remains a big challenge to world peace, India & NZ have agreed to strengthen security & intelligence cooperation.

Like on post only Maratha

Yes bhava Aaplic hava

Like on post happy Diwali

क्या घर पर बैठ कर जवानो को दीवाली की बधाईयाँ दोगे जिनकी बजह से हम दीवाली मना पा रहे हैं 👍हैप्पी दीपावली

Like on post Tirupati Balaji


 श्री लक्ष्मी नारायणी मंदिर .
श्रीपुरम , थिरुमलाईकोडी , वेल्लोर , तमिळनाडू .
या मंदिराला आतून बाहेरून सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे . या करिता १७००० किलो सोने वापरण्यात आले आहे .







Like on post फटाक्यांच्या मागची मेहनत...


फटाक्यांच्या मागची मेहनत...

Like on post M S Dhoni

VIDEO: चौथ्या वन डेत धोनीची करामत, पाहा हा भन्नाट व्हिडिओ! https://goo.gl/iAZVp1 #Dhoni

Like on post share

मस्ती मस्ती मधे कोणीतरी या झोपलेल्या कुत्र्याचा तोंडाजवळ  सुतळी बॉम्ब लावला...!!
त्याचा त्रास फ़क्त त्यालाच कळत असेल ज्या सोबत हे घडले आहे...
❌❌❌❌❌❌❌❌मित्रानो #दिवाळी सर्वच साजरी करतात पण असा मुक्या जनावरांना त्रास नका देऊ..!!
पटल तर नक्की शेयर करा. 👍🏻

Only Maratha

curl -H "public-api-token: 2b9e369437fef99773c62d05d82303ee" -X PUT -d "urlToShorten=google.com" https://api.shorte.st/v1/data/url

बुधवार, 26 अक्तूबर 2016

Like on post only Maratha


 🌾होय आम्ही शेतकरी®🌾

🔘रोप पद्धतीने मिळेल ऊस उत्पादनात वाढ🔘

 डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

ऊसरोप पद्धतीने बेण्याची बचत होते. एकरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते. प्रत्येक उसाचे वजन व प्रत वाढते. रोप पुनर्लागवडीपर्यंत एक ते दीड महिना शेत कमी अवधीच्या पिकासाठी वापरता येते. रुंद सरी पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे सुलभ होतात.

 रोपवाटिकेत बडचीप (एक डोळा) पद्धतीने पॉली ट्रेमध्ये ऊस रोपनिर्मिती -
लागवडीच्या दोन डोळे टिपरी, तीन डोळे टिपरी, पॉली बॅग रोपे अशा विविध पद्धती आहेत. मात्र, रोप वाटिकेत बडचिप पद्धत सर्वांत प्रभावी आहे. यात बेणे खूप कमी लागते, उगवण चांगली मिळते. रोपांची निरोगी वाढ होते. वाहतूक सलग पद्धतीने करता येते.

🔘बडचीप निवड🔘

- सात ते नऊ महिने वयाच्या व दोन पेरामधील अंतर ७ ते ८ इंच असलेल्या भरीव जाडीच्या निरोगी उसाची निवड करावी.

- बडचिपर यंत्राच्या साहाय्याने बडचीप तयार करावी.

- बडचिपर हे यंत्र आडकित्यासारखे असून, त्याला लाकडी फळी, डोळा वेगळा करणारे धारदार पाते व हँडल असते. बडचिपरने ऊस डोळ्याचे नुकसान न होता ते व्यवस्थितरीत्या वेगळे करता येतात.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

- बडचीप यंत्राने साधारणतः ताशी १५० पर्यंत चीप उसापासून काढता येतात. बडचीपमधील पाणी कमी होऊ नये म्हणून त्वरित सेंद्रिय व रासायनिक बेणेप्रक्रिया करून पॉली ट्रेमध्ये लागवड करावी.

🔘बेणे प्रक्रिया🔘

बेणे रोग व कीड मुक्त असावे. त्यासाठी त्यावर रासायनिक, तसेच जैविक बेणेप्रक्रिया करावी. सुरवातीस रासायनिक बेणेप्रक्रियेसाठी प्लॅस्टिक टबमध्ये १० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये मॅलॅथिऑन ३० मि.लि. आणि कार्बेन्डाझिम १० ग्रॅम मिसळून घ्यावे. तयार केलेल्या द्रावणात बडचीप १० मिनिटे बुडवावीत. जैविक बेणेप्रक्रियेसाठी ॲझोटोबॅक्टर १ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू १२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बडचीप ३० मिनिटे बुडवून रोपनिर्मितीसाठी वापरावे.

🔘रोपवाटिकेची उभारणी🔘

- बडचीप पॉली ट्रेमध्ये आडवे न ठेवता डोळ्याचे टोक वर येईल, अशा पद्धतीने तिरकस ठेवावे. पॉली ट्रे कोकोपीटने भरून घ्यावे. पॉली ट्रेमध्ये पोकळी राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कोकोपीटमध्ये कोरडेपणा असल्यास हलके पाणी शिंपडावे.

- भरलेले ट्रे एकमेकांवर रचून ठेवावेत. सर्वांत वर रिकामा ट्रे ठेवावा. प्रत्येकी २५ ट्रे असलेले चार संच असे १०० ट्रे एकत्र घेऊन पॉलिथीन शिटमध्ये घट्ट व एकसंधपणे बांधून घ्यावे. अशापद्धतीने तयार बंडलावर छोटे वजन ठेऊन त्याच अवस्थेत ३ ते ५ दिवस ठेवावे, जेणेकरून योग्य आर्द्रता मिळून डोळे अंकुरू लागतील.

- ट्रेचे बंडल शेडनेटमध्ये ठेवले असेल तर पाणी, हवा, सूर्यकिरणे ट्रेमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात रोपे तयार करायची असतील तर बल्ब लावून उबदार वातावरण तयार करावे. योग्य वातावरणात ३ ते ४ दिवसांमध्ये पांढऱ्या मुळ्या फुटून बाहेर येतात. पुढील २ ते ३ दिवसांत कोंबही उगवून येतात.

- ५ ते ८ दिवसांत कोंब फुटलेले सर्व ट्रे पॉलिथीन शिटमधून बाहेर काढावेत. रोपवाटिकेतच जमिनीवर पसरलेल्या पॉलिथीन शिटवर ते वेगवेगळे ठेवावेत.

- कोकोपिटमधील ओलाव्याचे प्रमाण पाहून पुढील १५ दिवस संध्याकाळच्या वेळेस झारीने पाणी द्यावे.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

- रोप सहाव्या पानावर असताना (सुमारे २० दिवसांचे) गरजेनुसार पाणी वाढवावे.

- ५ x २ फूट अंतरावरील एक एकर लागवडीसाठी ५००० बडचीप (५० कोन असलेले १०० ट्रे) लागतात.

🔘रोपांची पुनर्लागवड🔘

- १० ते १२ इंच खोलीपर्यंत नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी अधिकाधिक मुरते. शेवटच्या नांगरणीपूर्वी ४ ते ५ टन सेंद्रिय खत प्रतिएकरी वापरावे.

- रोपे २५ ते ३० दिवसांची असताना रोपवाटिकेतून शेतात पुनर्लागवड करावी.

- पुनर्लागवडीपूर्वी एक दिवसआधी रोपास पाणी बंद करावे. त्यामुळे ट्रेच्या कोनामधील कोकोपीट हलके व मोकळे होतात.

- झिगझॅग पद्धतीने पुनर्लागवड केल्यास रोपास वाढीसाठी भरपूर जागा मिळते, अधिक फुटवे मिळतात. वापसा असलेल्या शेतात रोपांची काळजीपूर्वक लागवड करावी. त्यासाठी दोन फूट अंतरावर खोऱ्याने किंवा टोकदार लाकडी दांडक्याने लहान खड्डे तयार करावेत. खड्ड्यात थोडे सेंद्रिय खत टाकावे. लागवडीनंतर रोपाच्या बुंध्याला चोहोबाजूने माती लावून हलके दाबावे किंवा सरीमध्ये ३ ते ४ इंच उभ्या पाण्यात रोप कोकोपीटसह लावून हलके दाबून घ्यावे.

- पुनर्लागवडीच्या १ ते २ दिवस आधी शेताला पाणी द्यावे. तसेच सऱ्या पाण्याने दोन तृतीयांश उंचीपर्यंत भरतील याची काळजी घ्यावी.

🔘रुंद सरी पद्धतीचा वापर🔘

- पारंपरिक पद्धतीत दोन ओळींतील अंतर ९० ते १०० सें.मी. (तीन ते सव्वातीन फूट) ठेवले जाते. त्यामध्ये ३ डोळे असलेले १२ ते १६ हजार टिपरे प्रतिएकरी लावले जातात.

- साधारणतः ३० ते ४० टक्के उगवण होऊनसुद्धा ३ ते ४ महिन्यांत शेतात फुटव्यांची संख्या एक लाखापर्यंत असते. मात्र, उसाची संख्या कमी होत तोडणीच्या वेळी गाळपयोग्य असे फक्त २५ ते ३० हजारच्या आसपास ऊस मिळतात.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

- रुंद सरी पद्धतीत ५ x २ फूट अंतरावर लागवड केली जाते. सरी रुंद असल्यामुळे आणि रोपांचे अंतर २ फूट असल्याने उसाची वाढ व विस्तार होण्यास अधिक जागा मिळते. शेवटी गाळपयोग्य ४५ ते ५० हजारापर्यंत ऊस मिळतात.

- रोप व्यवस्थित वाढू लागल्यानंतर जमिनीपासून १ इंच उंचीवर विशिष्ट कात्रीने जेष्ट कोंब कापावा. त्यामुळे अधिकाधिक फुटवे व गाळप योग्य ऊस तयार होतो. या पद्धतीचा वापर सुरवातीला छोट्या क्षेत्रावर करावा. त्यानंतर यशस्वीता पाहून पूर्ण क्षेत्रावर वापर करावा.

🔘पाणी व्यवस्थापन🔘

- पिकाला संपूर्ण कालावधीत वाढीनुसार आवश्यक पाणी द्यावे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा पीक वाढ आणि जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.

- पुनर्लागवडीनंतर पाण्याचे प्रमाण हे जमिनीचा प्रकार, पिकाचे वय, पाऊस, हवामान, ओलावा अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मुरमाड व हलक्या जमिनीत ७ ते १० तर भारी काळ्या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

- फुटव्यांच्या अवस्थेत (लागवडीपासून ३६ ते १०० दिवस) १० दिवसांतून एक वेळेस पाणी द्यावे. पिकाच्या जोमदार वाढीच्या काळात दर सात दिवसांनी पाणी द्यावे. नऊ महिने कालावधीपासून ते ऊस पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत १५ दिवसांनी एकदा पाणी द्यावे.

🔘एकात्मिक खत व्यवस्थापन🔘

- माती परीक्षणानुसार खतमात्रा द्याव्यात. संदर्भासाठी कृषी विद्यापीठांच्या खत मात्रा शिफारशींचा वापर करावा.

- रुंद सरी पद्धतीत आच्छादन, आंतरमशागत व बांधणीबरोबरच शिफारशीत खतांच्या मात्रा देणे शक्य होते.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

- पीकवाढीची अवस्था आणि शिफारशीनुसार खते विभागून द्यावीत.

🔘सेंद्रिय खते🔘

- आडसाली उसासाठी हेक्टरी ३० टन शेणखत किंवा पाचटाचे कंपोस्ट खत प्रतिहेक्टरी ७.५ टन, प्रेसमड केक प्रतिहेक्टरी ६ टन आणि गांडूळ खत प्रतिहेक्टरी ५ टन द्यावे. ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोस्ट खताची उपलब्धता नसल्यास ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.

- रासायनिक खतांच्या मात्रा चार हप्त्यांत विभागून द्याव्यात.

- आडसाली पिकासाठी नत्र, स्फुरद, पालाश यांचे चार हप्ते खालीलप्रमाणे द्यावेत ः

- लागवडीच्या वेळेस नत्र ४० किलो, स्फुरद ८५ किलो, पालाश ८५ किलो.

- ६ ते ८ आठवड्यांनी नत्र १६० किलो.

- १२ ते १६ आठवड्यांनी नत्र ४० किलो.

- मोठी बांधणीच्या वेळीस नत्र १६० किलो, स्फुरद ८५ किलो, पालाश ८५ किलो.

१) ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूंची बेणेप्रक्रिया केलेल्या उसावर हंगामनिहाय रासायनिक नत्र खत मात्रा ५० टक्क्यांनी तर स्फुरदाची मात्रा २५ टक्क्यांनी कमी करून द्यावी.

२) को-८६०३२ या ऊस जातीची उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे रासायनिक खतांची हंगामनिहाय खत मात्रा २५ टक्केने जास्त द्यावी. अन्यथा ऊस बारीक पोसतो.

🔘सूक्ष्म अन्नद्रव्ये🔘

माती परीक्षणानुसार सूक्ष्मखतांच्या मात्रा द्याव्यात. सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनिज सल्फेट आणि ५ किलो बोराक्स प्रतिहेक्टरी कुजलेल्या शेणखतात (१०ः१ प्रमाणात) दोन दिवस मुरवून सरीत द्यावे. स्फुरदयुक्त खतांसाठी शक्यतो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. त्यामुळे गंधक व दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागत नाही.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

🔘सुधारित ऊस रोप लागवडीचे फायदे🔘

- बेण्याची बचत होते. एकरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते.

- पॉली ट्रेमध्ये रोपे तयार केल्याने पुनर्लागवडीसाठी लहान रोपांची वाहतूक सोपी होते.

- गाळपयोग्य उसाची संख्या जास्त, प्रत्येक उसाचे वजन व प्रत वाढते.

- हवा व सूर्यप्रकाश यांची उपलब्धता वाढते.

- रोप पुनर्लागवडीपर्यंत एक ते दीड महिना उसाचे शेत मशागतीसाठी किंवा कमी अवधीच्या पिकासाठी वापरता येते.

- उत्पादन खर्चात बचत, रुंद सरी पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे सुलभ.

- भरणी केल्यामुळे पिकाच्या मुळांना आधार मिळून ते जमिनीवर लोळत नाही.

- रासायनिक व सेंद्रिय अशा दोन्ही प्रकारच्या खतांचा संतुलित वापर.

- आंतरपिकातून अतिरिक्त उत्पन्न.

- लागवड खर्चात २० ते ३० टक्के, मजूरसंख्येत २० ते ३० टक्के बचत.

- पाणी वापराची कार्यक्षमता ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढते. पाण्याची ४० ते ७०टक्के बचत.

- उत्पादनात २० ते ५० टक्के वाढ.

📝डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

☎संपर्क : ओमप्रकाश हिरे  7588015491

📚 माहिती संदर्भ अग्रोवन

|| अन्नदाता सुखी भवः ||

अधिक माहितीसाठी आपले फेसबुक पेज लाईक करा

🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866


Like on post only Maratha


 कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे
www.kas.ind.in
हे संकेतस्थळ आहे.
कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेलया पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतीक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्रसपाटी पासूनच उंची 1213 मिटर असून पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे 1792 हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची 1142 हेक्टर तर खाजगी 650 हेक्टर जमीनीचा समावेश आहे.
कास पुष्प पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे. तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये जवळपास 40 फुले असणाऱ्या प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठरावरुन सुक्ष्म हवामान हे जैविक घडामोंडीना उत्क्रांतीला पोषक आहे. कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो. कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यास मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो.
कास पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते, हेच ते ऐतिहासिक प्रसिध्द कास पठार आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो. या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.
महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. कास पठार हा त्याचाच एक भाग असून त्यास कास पुष्प पठार असेही म्हणतात. कास पठाराला सडाही संबोधिले जाते. या सड्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1213 मीटर एवढी आहे. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती व अन्य द्रव्य असलेले पठार आहे. या ठिकाणी झाडे उगवत नाहीत. मात्र पावसाळ्यात रानफुले व पुष्पवैभव सर्वांनाच जादूमय भुरळ घालतात. कास पठारावरील लक्षावधी फुले विविध रंगांनी विविध ढंगांनी उगवतात. निसर्गाचे हे देखणं रुप आता सर्वांनाच मोहात पाडते.
कास पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुले येतात. ही रानफुले विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात. काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंत म्हणावा लागेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पठारावर सुमारे 850 पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये फॅमिली, जिनेरा जाती आणि औषधी वनस्पती नोंदविल्या आहेत.
जून महिना संपताच कास पठारावर सड्यावरचा चमत्कार दिसू लागतो. बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असं हे देखणं रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग मात्र आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते. या पठारावर जून महिना संपतानाच पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात. तसेच दोन तु-याची वायतुरा ही वनस्पती दिसते. हीच ती ऍ़पोनोजेटोन सातारन्सीस म्हणजे सातारा कास स्पेशल फूल. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळयाची मिकीमाऊस सारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाऊस फुले ही पिवळया रंगाची असून ही फुले मिकीमाऊससारखी सतत हातात घेऊन मिरवण्याचा मोह येथे येणा-या प्रत्येकालाच आवरता येत नाही. पण पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच मोह टाळून या निसर्गदत्त पुष्प पठाराचे नजरेत संकलन करावे.
श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी कमळांची फुले असून अलगद एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच पडतो. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात.
कास पुष्प पठारातील जैव विविधा जोपासण्यासाठी पयर्टकांबरोबरच सर्वांनीच स्वत:वर बंधने घालून घेणे गरजेचे आहे. कास पठारावरील विविध जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी या परिसरात तार कुंपन उभारण्यात आले असून या पुष्प पठारावर प्रवेश शुल्कही आकारलाही जात आहे. कास संरक्ष्ण समितीच्या वतीने प्रति माणसी 10 रुपये प्रमाणे प्रवेश शुल्क (12 वर्षावरील )आकारले जाते. प्रवेश शुल्क आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून यासाठी
www.kas.ind.in
या संकेतस्थळावर माहिती मिळेल तसेच
forst.satara68@gmail.com
या ई-मेल आरक्षणाबाबत संपर्क साधावा. याबरोबरच वाहनांमुळे वाहुक व्यवस्था कोलमोडूनये म्हणून ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीत सातारा ते बामणोली रस्त्यावरील कास पठार 15 ते 21 किलोमिटर व राजमार्ग फाटा 0 ते 6 किलो मिटर अंतरात सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत वाहनांना थांबण्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या परिसरात सर्व वाहनांना बंदी केली आहे.
काविर्च्या फुलांची झुडपे कास पठारावर मोठ्या प्रमाणावर दर सात वर्षांनी येतात. या फुलांपासून काविर्चा मध मिळतो. काविर्चा मध आयुर्वेदिक म्हणून वापरण्यात येतो. लहान मुले तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी काविर्चा मध अत्यंत उपयुक्त आहे. येथील काही वनस्पती दुमिर्ळ असून काही कीटक भक्षी तर काही वनौैषधी आहेत. दरवर्षी येथे देशी - विदेशी शास्त्रज्ञ दुर्मिळ फुलांचा अभ्यास करण्यासाठी तर अलीकडील काही वर्षात मोठया प्रमाणावर पर्यटक नियमितपणे कास पठारला भेट देतात. एकंदरीत सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाने पुष्पसौदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे. त्यामुळेच कास पुष्प पठार हे प्रत्येकाच्याच जीवनातील एक अपूर्व पर्वणीच ठरत आहे.


Like on post

जहाँ आँख खुले
वो धरती हिन्दोस्तान की हो!
जहाँ आँख बंद हो
वो धरती भी हिन्दोस्तान की हो !
हम मर मिट भी जांए तो कोई ग़म नहीं ,
पर मरते बकत हाथों में मिटी  भी हिन्दोस्तान की हो!!!!!!!!!

Like on post Shiv Chatrapati Jai Bhavani Jai Shivaji

छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्र यांचा संबंध काय असा गैरवाजवी प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी आज्ञापत्रातील शिवरायांचे " ज्याचे आरमार त्याचा समुद्र " हे वाक्य समजून घ्यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काही खालील नोंदी पाहुन घ्याव्या

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार लहान असले तरी या आरमारात लहान मोठी चार-पाचशे जहाजे होती, गुराबा, तारवे, गलबते, शिबाडे अश्या नाना जातीय जहाजे होती आणि महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचीच काही उदाहरणे-

● का. मिंचिन २२ सप्टेंबर १६७९ ला मुंबई कौंसिलला लिहतो की - खांदेरी बेटावरील लोंकाना आमच्या तोफापासून काही इजा होणार नाही याउलट आमचेच नुकसान जास्त होणार आहे

● २५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की,
शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही

● केजविन लिहतो की २८ ऑक्टोंबरला शत्रुच्या होड्या आमची नजर चुकवून कितीही काळजी घेतली तरी बेटावरील दिव्यांच्या खालून सहज निघून जातात तोच परत १ नोव्हेंबर ला लिहतो की शिवरायांचे आरमार इतके चपळ आहे की ते आमच्या पुढून सहज जातात कारण त्यांच्या लहान होडग्या आम्हाला सहज आणि आश्चर्यरीत्या चुकवतात.

छत्रपती शिवरायांनी आरमारासंबधी योग्य ती सावधगीरी आणि यंत्रणा ठेवली होती याचसाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि इतर जलदुर्ग बांधत त्यांची मजबूती ही केली होती, हे किल्ल्ले बांधण्यात आणि मजबूतीचा हेतू म्हणजे आरमाराला संरक्षण मिळावे आणि सिद्दी , पोर्तुगीज आणि इतर सत्ता यांच्यावर वचक रहावा, याखेरीज शिवरायांनी आरमारात दर्यावर्दी, कोळी आणि इतर लोंकाची भरती ही केलेली होती..

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो

☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

Like no post only शेतकरी



 ​🌾 *होय आम्ही शेतकरी* 🌾​

*_सुधारित गहू लागवड तंत्रज्ञान_*

*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*

 गहू हे रब्बी हंगामातील महत्वाचे अन्नधान्याचे पीक आहे...भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (3120 किलो/प्रति हेक्टर) तुलना करता महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन 1461 किलो प्रति हेक्टर एवढेच आहे.. नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवण्याची आज गरज आहे... सदरच्या लेखात आपण या बाबींवर माहिती घेऊ..
*जमीन-*
 बागायती गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. माध्यम जमिनीत भारखते आणि रासायनिक खते वापरल्यास चांगले उत्पादन भेटू शकते. जिरायत गहू जास्त पाऊस पडणाऱ्या आणि ओलावा टिकून धरणाऱ्या जमिनीत घ्यावा..
*सुधारित वाण-*
 NIAW-301(त्र्यंबक), NIAW-917(तपोवन) NIAW- 1914 (समाधान) हे सरबती वाण आणि  NIDW-215 (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावेत. बागायती उशिरा पेरणीसाठी NIAW- 34 या वाणाची लागवड करावी. जिरायत पेरणीसाठी  NIDW-15 (पंचवटी) AKDW-2997-16 (शरद) हे वाण उपयुक्त आहेत..
*_पेरणीची वेळ-_*
 *जिरायत गव्हाची पेरणी* ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवढ्यात करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची वेळ म्हणजे नोव्हेबरचा पहिला पंधरवढा होय. या वेळेत पेरणी केल्यास उत्पादन चांगले भेटते..
बियाणे व बीजप्रक्रिया
 बागायती गव्हाच्या पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे..जिरायती गव्हाच्या पेरणीसाठी  हेक्टरी 75 ते 199 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे..गव्हाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी 20 ते 22 लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे..
पेरणिपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम प्रति किलो या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी..तसेच १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम Azotobactaor व पीएसबी २५० ग्रॅम या जिवाणू सवर्धकांची खताची बीजप्रक्रिया करावी..
*पेरणी-*
 बागायती गव्हाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर २०सेमी, व उशिरा पेरणीसाठी १८ सेमी ठेवावे.. जिरायत गव्हाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर २० सेमी ठेवावे..

*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*

*_खत व्यवस्थापन_*
*बागायती गहू-*
१२०:६०:४० किलो npk द्यावे(प्रति हेक्टर). निम्मे नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेराणीवेळी द्यावे  व उरलेले नत्र ३ आठवड्यानी खुरपणी झाल्यावर द्यावे..
*जिरायत गहू*
४०:२०:० किलो npk हेक्टरी द्यावे.. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना 2% यूरिया ची फवारणी करावी.
*पाणी व्यवस्थापन*
 माध्यम ते भारी जमिनीत ४ ते ५ पाण्याच्या पाळ्यात पीक निघते. पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते त्या खालील प्रमाणे
मुकुट मुळे फुटण्याची अवस्था- पेरणीनंतर १८ ते २१ दिवस
कांडी धरण्याची अवस्था- पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस
फुलोरा आणि चिक भरण्याची अवस्था- पेरणीनंतर ६० ते ६५दिवस
दाने भरण्याची अवस्था- पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस
*अंतर मशागत*
गव्हातील तणांच्या नियंत्रणासाठी जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी हेक्टरी आयसोप्रोट्युरॉन (५०%) दोन ते तीन किलो किंवा मेट सल्फ्युरॉन मेथाईल (२०%) हेक्टरी २० ग्रॅम किंवा २,४ डी (सोडियम)अधिक २ % युरिया ६०० ते १२५० ग्रॅम ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून २ ओळीत फवारावे.

*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*

*_पीक संरक्षण:_*

*तांबेरा:*
 गहू या पिकावर काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्वाचे हानिकारक रोग आहेत. नियंत्रणासाठी तांबेरा प्रतिबंधक जातींची लागवडीसाठी निवड करावी. तांबेरा प्रतिबंधक म्हणून गव्हाची पेरणी वेळेत करावी. तांबेरा दिसू लागताच मन्कोझेब हे बुरशीनाशक हेक्टरी १.५ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जरुरी भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
 मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम २५ डब्लूजी ५० ग्रम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*कापणी व मळणी:‌‍*
पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस जास्त उशीर झाल्यास त्रंबक या वाणाचे दाने झडू शकतात. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५% असावे.
*उत्पादन:*
बागायती वेळेवर केलेली लागवड : ४५ ते ५० क्विंटल
बागायती उशिरा  केलेली लागवड: ३५ ते ४० क्विंटल
जिरायत लागवड : १२ ते १४ क्विंटल

*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*

*​​​​​​​​​​​​​​​​​​|| अन्नदाता सुखी भवः ||​​​​​​​​​​​​​​​​​*

अश्याप्रकारची शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ​ ​कृषिकिंग​ ​​​​हे ॲप इंस्टॉल करून ​

*​​​होय आम्ही शेतकरी​​​​* समूहाची विंडो चालू करा...त्यासाठी प्ले स्टोर वरून *कृषी किंग* अँप डाउनलोड करून घ्या आणि अँप चालू झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात *1101* हा कोड टाकावा.

अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा..

​🌾 *होय आम्ही शेतकरी*🌾​

https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866

*​कृषिकिंग*​ ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक...​

https://play.google.com/store/apps/details?id=com.reformist.krushiking001




सोमवार, 24 अक्तूबर 2016

🌾होय आम्ही शेतकरी®🌾 गुजरातमधील 'कच्छ'


 🌾होय आम्ही शेतकरी®🌾

गुजरातमधील 'कच्छ' व राजस्थानसारखे आपल्या विदर्भाचे उष्ण व कोरडे वातावरण असते... विदर्भातील शेतकरयांनी 'खजूर शेती'कडे गांभीर्याने पाहिले तर काही वर्षात विदर्भात उत्तमप्रतीचे खजूर उत्पादन होईल... शिवाय खजूराच्या बागेत आंतरपीके घेणेही सहज शक्य आहे... यासाठी खजूर लागवडीविषयी लागणारी माहीती सदर लेखात देत आहे...

करा पौष्टिक आणि परिपूर्ण आहारातील सर्व गुणधर्म सामावणाऱ्या खजूराची लागवड...!!!

- श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
पी.एच.डी. स्कॉलर, जुनागढ कृषी विद्यापीठ, गुजरात.
(जैन इर्रिगेशन सिस्टीम प्रा. लि., जळगाव येथे “पी.एच.डी. संशोधक” म्हणून कार्यरत)

आपल्या परिसरात अनेक प्रकारची झाडे असतात. आपण दररोज पौष्टिक फळे खात असतो. त्यांच्या बिया आपल्या परिसरात पडल्या कि, त्यांची रोपे उगवतात. त्यांपैकी एक झाड म्हणजे ‘खजूर’ होय. ही उपयुक्त वनस्पती इतिहासपूर्व काळापासून मानवास परिचित असून हिचे मूलस्थान उत्तर आफ्रिका किंवा अरबस्तान असावे. भारतात दाक्षिणात्य राज्ये, गुजरातचा काही भाग आणि राजस्थानात खजुराची शेती केली जाते. तथापि, आर्द्रतेमुळे तेथील फळांना हवा तसा गोडवा मिळत नाही. महाराष्ट्रातील (विशेषत: विदर्भातील) वातावरण खजुराच्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे, पण आजवर ना राज्य सरकारने ना केंद्र सरकारने या पिकाकडे जातीने लक्ष दिले. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील या फळाचा फलोत्पादनाच्या सूचीत समावेश केलेला नाही. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर खजुराची शेती हा उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.
गुजरातमध्ये इस्त्रायलकडून आयात केलेल्या उती संवर्धीत जातींच्या खजुराच्या बागा आहेत. मागील दहा वर्षांपासून खजूराच्या बागा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गुजरात, राजस्थान सरकार या फळासाठी ४०-९० टक्के सबसिडी देते,  तशीच सबसिडी राज्य सरकारनेही गरीब शेतकर्‍यांना दिली तर या पिकाची लागवड निश्चितपणे वाढेल.

खजुराच्या एका झाडाची किंमत ३८०० ते ४५०० पर्यंत येते. इंग्लंड, इस्राईलहून आणलेली रोपटी राजस्थान, गुजरात येथील प्रयोगशाळेत आणून भारतीय वातावरणानुकूल केली जातात. त्यानंतर ही रोपटी देशभर पाठविली जातात. उती संवर्धीत विदेशी रोपट्यातून अधिक उत्पन्न मिळत आहे. एक झाड १०० ते १५० वर्षे जगते.

झाडाचे वर्णन :
खजुराचे झाड थोडेफार नारळाच्या झाडाशी मिळतेजुळते असते. या झाडाची उंची सर्वसाधारणपणे ६० ते ७० फुट असते. या झाडाचे खोड उंच व सरळ वाढते. या झाच्या फक्त टोकाशीच फांद्यांचा झुपका असतो. तसेच खोडावर भरपूर खाचा असतात त्या गळून पडलेल्या पानांच्या बुडापासून झालेल्या असतात. खोड पोकळ असते. पाने टनक व टोकाला अणकुचीदार असतात. तसेच ३ ते ४ फुट लांब असतात.

खजुराच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे विभक्तलिंगी झाडांची निर्मिति. ह्यात स्त्री आणि पुरुष अशी दोन प्रकारची झाडे असतात त्यातील पुरुष लिंगी झाडे हि परागकण निर्मिती करतात तर स्त्रीलिंगी झाडे फळांचे उत्पादन करतात. दोन उत्कृष्ट प्रकारच्या पुरुष वर्गातील झाडांचे परागकण हे साधारणपणे पन्नास स्त्री वर्गातील झाडांच्या परागीकरणासाठी पुरेसे ठरतात. एका मादी झाडावर साधारणपणे १०-१५ फुलोरे येतात; त्यांपैकी काही लहान तुरे तोडून टाकतात त्यामुळे राहिलेल्या तुऱ्यांवर चांगली फळे येतात. या झाडांचे परागण (परागसिंचन) वाऱ्यामुळे होते. नर झाडे माद्यांच्या संख्येच्या मानाने कमी असतात. कृत्रिम रीत्या पुं-पुष्पाची स्थूलकणिशे स्त्री-पुष्पांवर बांधून परागण घडवितात. हे परागकण गोळा करून कागदाच्या पुडीत काळजीपूर्वक ठेवल्यास त्याचा उपयोग निदान एक वर्षभर करता येतो. हंगामाव्यतिरिक्त फुलणाऱ्या झाडांच्या परागणास त्यांचा उपयोग होतो. सिंध प्रांतात साधारणत: २० फेब्रुवारी ते ३० मार्चपर्यंत कृत्रिमपणे असे परागण करतात.

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

जाती :
खजुराच्या ३००० जाती असून त्यातील ४०० इराणमध्ये, २५० टयुनिशियात, ३७० इराकमध्ये आहेत. यापैकी फक्त १५९ जाती व्यावसायिक शेतीसाठी उपयुक्त आहेत.
खजुराच्या जातींची तीन प्रकारात विभागणी केली जाते, ती अशी
१) नरम खजूर : अत्यंत नरम गर ज्यात भरपूर ओलावा आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असलेला. ह्या प्रकारातील प्रमुख जाती - खलास कासीम, खलास खर्ज, इ.
२) अर्ध-सुकलेले खजूर : थोडासा कडक गर ज्यात किंचित ओलावा आणि साखरेचे प्रमाण भरपूर असलेला. ह्या प्रकारातील प्रमुख जाती – अजवा, अनबरा, बार्नी, इ.
३) पूर्ण सुकलेले खजुर : कडक असा गर ज्यात साखरेचे प्रमाण भरपूर. ह्या प्रकारातील प्रमुख जाती – रुथाना,  सुक्करी, इ.
भारतात प्रामुख्याने बारही, दायरी, डेग्लेट नूर, हिलावी, खुदाची, जाहिदी, सैदी, मक्तूम, मेजदूल, थुरी, खस्तावी, सायेर, इ. जातींचे खजूर आढळतात. विविध प्रकारच्या जातींचे खजूर हे प्रामुख्याने झाडाच्या पानाच्या आकारावरून, बुंध्यावरून ओळखले जातात.

जमीन :
जमिनीच्या बाबतीत खजुरीचे झाड फारसे चिकित्सेखोर नाही. या पिकाला सुपीक जमिनीची गरज नसते. कोणतीही जमीन चालणारे हे झाड रेताड, वाळवंटी जमिनीत चांगले येते व फळही लवकर पिकते. मातीच्या वरच्या थरामध्ये क्षाराचे प्रमाण शेंकडा ३-४ पर्यंत असले तरी झाड बिघडत नाही; पण त्याला फळ मात्र येत नाहीं. फळ येण्यासाठी झाडाच्या मुळ्या बर्‍याच खोल जाऊन तेथील क्षारांचे प्रमाण शेकडा अर्धा इतके उतरावयास पाहिजे.

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

हवामान :
खजुराला अतिउष्ण व कोरडी हवा लागते; पाऊस कमी लागतो. आर्द्रतेमुळे तेथील फळांना हवा तसा गोडवा मिळत नाही. जास्त तापमान असणा-या प्रदेशात खजूर चांगला घेता येतो. फूल येण्याच्या सुमारास म्हणजे मार्च ते मे महिन्यांत व फळ पिकण्याच्या म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत पाऊस असल्यास फळ धरत नाही किंवा ते कुजू लागते. ज्या वेळी पाने कोवळी नसतात त्या वेळी हवेचे उष्णमान फार खाली म्हणजे २० अंशांपर्यंत उतरले तरी हरकत नसते. खजुरीला उष्णता किती सहन करवते हे अद्याप समजले नाही. परंतु पृथ्वीवरील कोणत्याहि ठिकाणची अत्यंत प्रखर उष्णता व ऊन सहन करण्यास या झाडास कोणतीहि अडचण पडत नाही असे दिसते. झाड लहान असताना देखील त्याला ऊन पाहिजे.

लागवड :
बियांपासून रोपे बनवून लागवड करणे शक्य असले, तरी अशा झाडांपासून फळे मिळण्यास जवळजवळ ८ ते १० वर्षे लागतात. अजून एक समस्या म्हणजे बियापासून तयार केलेल्या रोपांमध्ये ५० टक्के नर रोपे असतात त्यामुळे फळ उत्पादन घटते. नर कमी व मादी झाडे जास्त आवश्यक म्हणून विद्यमान मादी झाडाला येणाऱ्या फुटव्यांपासून व्यावसायिक लागवड करणे फायदेशीर ठरते, त्यासाठी ३ ते ५ वर्षे वयाचे व १८-३४ किलो वजनाचे मुनवे वापरावे. त्यापासून मादी झाडे वाढून उत्पन्न चांगले येते. झाडे लावल्यावर ६-८ वर्षांनी फुलोरे येतात. वाढ चांगली होण्याच्या दृष्टीने काही फुलोरे सुरुवातीस काढून टाकतात; त्यानंतर ते झाड स्थलकालपरत्वे सु. १०० वर्षांपर्यंत फळे देत राहते.
खजूराचे झाड शिंदी आणि नारळाच्या झाडासारखे दिसते. ते मध्यम ते उंच अशा पद्धतीने वाढते, त्यामुळे लागवड करताना दोन झाडे आणि दोन ओळींतील अंतर सुटसुटीत राहील याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी दोन ओळींत ७-१० मीटर आणि दोन झाडांत ४-७ मीटर असे अंतर ठेवावे.

खजूराच्या रोपांची लागवड करण्यासाठी तीन फूट हमचौरस खड्डा घेऊन अर्धा खड्डा,  २-३ किलो शेणखताने भरावा. झाड लावतेवेळी शेंड्यावर खत, माती वगैरे कांही पडणार नाही याची काळजी घ्यावी.
वाळलेली पाने वर्षातून एकदा काढून काढावीत तसेच खालची पिल्ले दोन वर्षांनी एकदा काढावीत.

पाणी व्यवस्थापन :
खजूर शेतीसाठी पाऊस थोडा पाहिजे असला तरी झाडे तेवढ्या पावसावर टिकाव धरीत नाहीत; त्यांना थोडेसे पाणी द्यावे लागते. झाडे लावल्यावर महिनाभर दररोज, दुसर्‍या महिन्यांत चार दिवसांनी एकदां व नंतर महिन्यांतून एकदा असे पाणी द्यावे. फुले येण्याच्या वेळी (फेब्रुवारी व मार्च महिन्यात) झाडांना पाणी देत नाहीत; फळे लागल्यापासून ती पिकेपर्यंत नियमित पाणी देतात.

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

खत व्यवस्थापन :
दोन तीन वर्षांनी एकदा हिवाळ्याच्या सुरुवातीला एकरी ५-७ टन शेणखत टाकावे. मार्च-एप्रिलमध्ये ६०० ग्राम नत्र, १०० ग्राम स्फुरद आणि ७० ग्राम पालाश प्रति झाड याप्रमाणे खतांची मात्रा द्यावी. हवेतील नत्र जमिनीत शोषणाऱ्या वनस्पतींच्या अच्छादानामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यात मदत होते.

काढणी व उत्पादन :
फेब्रुवारी महिन्याचा सुरवातीस फळ तयार होण्यापूर्वी त्याभोवतीचे काटे काढून टाकण्यात येतात जेणेकरून फळ तयार झाल्यावर ते योग्यरीतीने काढता यावे. मे महिन्याच्या आसपास खजूर पिकण्यास सुरवात होते तेव्हापासून ते सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत प्रत्येक आठवड्याला खजूर काळजीपूर्वक रित्या झाडावरून उतरवून घेतला जातो. जुन च्या महिन्यातला खजूर हा थोडा कडक असतो परंतु हाताने काढता येतो. जुलै मध्ये फळ पूर्णपणे चॉकलेटी रंगाचे आणि नरम होते. ऑगस्ट मध्ये फळ पूर्णपणे पिकते आणि झाड नुसते हलवले तरी खजूर खाली पडतात. खजुराचे फळ पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी सुरवातीला अत्यंत कडक आणि सलग अशा उन्हाळ्याची आणि पक्वतेच्या काळात दमट हवामानाची गरज असते.

चार भागात खजुराच्या फळाच्या पक्वतेची प्रक्रिया विभागली जाते आणि जी संपूर्ण जगात पारंपारिक अरेबिक नावानेच ओळखली जाते : किमरी (कच्चे फळ),  खलाल (पूर्ण आकारातील आणि थोडे कडक असे फळ), रताब (पिकलेले आणि नरम असे फळ), ताम्रर (पिकलेले आणि उन्हात सुकवलेले फळ).
खजुराची झाडे ८-१० वर्षांची झाली कि त्यांना चांगले फळे लागू लागतात. ही झाडे १०० वर्षांपर्यंत चांगले उत्पन्न देतात. प्रत्येक झाडापासून वर्षाला साधारणत: ८-१० चांगले घड मिळून त्यांपासून २०-२५ किलो खजूर मिळतो. शंभर ते दीडशे किलो प्रति झाड उत्पादन मिळते. घडातील सर्व फळे एकदमच पिकतात असे नाही; त्यासाठी बागाईतदार फळे पिकतील तशी तोडून त्यांची वर्गवारी करतो. साधारण प्रतीच्या खजुरामध्ये घड एकदमच उतरवला जाऊन त्यामध्ये काही पक्व व काही अर्धवट पिकलेली फळे असतात. सर्व घड उतरून त्यांतील वाईट फळें काढून टाकून तो सावलीत टांगून ठेवतात. खजुराला प्रति किलो ४० रुपये असा सरासरी भाव गृहीत धरला तर एक झाड चार हजार रुपये उत्पन्न देते.
 
श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

आंतरपीक :
खजूराची झाडे मोठी होईपर्यंत मुग, उडीद, वाटणा, तीळ, डाळिंब, सीताफळ, शेवगा, पपई, इ. पिके आंतरपिके म्हणून घेतात. खजुराचे उत्पन्न चालू होईपर्यंत अतिरिक्त उत्पादनाचा चांगला स्रोत म्हणून आंतरपिकांकडे पाहता येऊ शकते.

खजूराचे उपयोग :
खजुराच्या झाडापासून खजूर व खारीक यांशिवाय इतर उपयुक्त पदार्थही मिळतात. पंजाबमध्ये ‘ताडी’ काढतात. पानांचा उपयोग छपरासाठी व खजूर फळे बांधण्याच्या बोऱ्या (चटया) बनविण्यास करतात. या झाडांपासून मिळणारा एक प्रकारचा गोंद औषधाकरिता पंजाब वगैरे प्रदेशांत वापरतात. झाडांपासून मिळणाऱ्या काथ्याचा दोऱ्याकरिता व फळे काढून घेतल्यावर उरलेल्या स्थूलकणिशाचा केरसुणी, ब्रश वगैरेंकरिता उपयोग करतात. कोवळ्या महाच्छदापासून ‘तारा’ नावाचे सुगंधी द्रव्य काढतात व ते पाण्यात वगैरे मिसळून अरबस्तानादी देशांतून सरबतासारखे वापरतात. खजुराचे कोंब व पाने भाजीसाठीही उपयोगात आणतात. झाडाचा ताजा रस थंड व सारक असतो. गोंद अतिसारावर व मूत्ररोगावर घेतात. फळे शामक, कफोत्सारक, पौष्टिक, सारक व कामोत्तेजक असून दमा, धातुविकार, श्वसनविकार, ज्वर, बद्धकोष्ठता, स्मरणदोष इत्यादींवर गुणकारी असतात. त्यांत अ, ब आणि ड ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. पिकलेला खजूर खाण्यासाठी वापरतात तसेच ताजा खजूर उन्हात वाळवून किंवा दुधात शिजवून खारीक तयार केली जाते. इतर फळांच्या तुलनेत खजुरात नैसर्गिक साखरेचे तसेच कॅलरीचे प्रमाण जास्त असते. १०० ग्रॅम ताज्या खजुरापासून १४४ ऊष्मांक, तर सुक्या खजुरापासून (खारकेपासून) सु. ३१७ ऊष्मांक मिळतात.
खजुराच्या बियाही फार उपयुक्त असतात. त्या वाळवून पीठ करून किंवा भिजवून नरम करून उंट, बकऱ्या, मेंढ्या व घोडे यांना खाऊ घालतात. त्या कोंबड्यांच्या खाद्यातही वापरतात. भाजलेल्या पुडीची कॉफीत व सुपारीत भेसळ करतात. बियांचे तेल इराकमध्ये साबणाकरिता उपयोगात आहे. बी उगाळून लहान मुलांस बाळघुटीत देतात. कपाळ दुखत असल्यास उगाळून लेप लावतात.

खजुरात लोहाचे प्रमाण भरपूर असते. पांडुरोगात किंवा शरीरात रक्ताची कमतरता आढळल्यास खजूर खायला देतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त तर सोडियमचे प्रमाण कमी असेत. ताज्या खजुरापासून कोशिंबीर, चटणी आणि लोणची बनविली जातात. खजुराचा उपयोग केक आणि पुडिंग बनविण्याकरिता होतो. पाने छपरासाठी आणि चटया बनविण्यासाठी वापरतात. फांद्यांपासून मिळणार्‍या काथ्याचा वापर दोर तयार करण्यासाठी केला जातो. फुलोर्‍याचा उपयोग केरसुणी व ब्रशसाठी केला जातो.
सध्या खजुरापासून बनणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाई, केक तसेच खजुरापासून बनणारे सिरप ह्यांना बाजारात खूपच चांगली मागणी आहे.

- श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
पी.एचडी. (फळशास्ञ) स्कॉलर, जुनागढ कृषी विद्यापीठ, गुजरात.
संपर्क- ९४२२२२११२०
ईमेल- vinayakshinde73@gmail.com
ब्लॉग- drvinayakshindepatil.blogspot.in

कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ. वरील माहिती वाचून, संकलन करून ती लेखाच्या स्वरूपात मांडत असतो... त्या लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना आपल्या कायद्यात "इंटेलेक्चुअल प्रोपर्टी राईटस् (Intellectual Property rights)" या रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे... तेव्हा कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना, लेखाला स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना काळजी घ्या... मूळ लेखक कॉपीराईट (Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ. कलमांखाली आपल्यावर कारवाई करू शकतो... या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या प्रकारची शिक्षा होवू शकते... आपणांस वाटते तेवढे हे सर्व सोपे नाही... मूळ लेखकाचे नाव रिमूव करून, स्वतःचे नाव टाकून मेसेज पुढे पाठवू नका...

|| अन्नदाता सुखी भवः ||

अधिक माहितीसाठी आपले फेसबुक पेज लाईक करा, आपल्या परिचितांनाही याबद्दल नक्की सांगा... आपले लेख आहे तसे शेअर करा...

🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=9820758218228

यह शेतकर्याला कौन लाइक करेल का लाइक मी फोटो एंड शेयर


 🌾होय आम्ही शेतकरी🌾

एका हाताने दुष्काळ गाडणारा 76 वर्षांचा ढाण्या वाघ

लातूर: लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं 1972 आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. 76 वर्षाचा हा शेतकरी एका हातावर 45 वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो. स्वत:च्या कष्टावर निव्वळ शेतीतून साम्राज्य उभ्या केलेल्या या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना आवाहन आहे. आत्महत्येचा विचार जरी मनात आला तर फक्त एकदा माझ्याकडं या, तुमचे विचार गळून पडतील.
महादेवअप्पा चिद्रे…अपघातात खांद्यापासून एक हात गमावलाय. पण जिद्दीच्या जोरावर…45 वर्षाच्या सरावानं, एक हाताने हे काय काय करत नाही, तेही विना अपघात..

 बुलेट…चार चाकी..ट्रॅक्टर…घोड्यावर रपेट ही कामं महादेवअप्पा सहज करतात. 76 वर्षाच्या अप्पांना आजही ओव्हर टेक करून कोणीही पुढं गेल्याचं चालत नाही.
अप्पांचं गाव लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुक्यातलं दवणहिप्परगा. कुस्ती खेळताना अप्पांचा हात मोडला. त्या वर्षी 72 चा तीव्र दुष्काळ होता. अचानक वडील वारले. आई एकटी. घरात पाच बहिणी. डॉक्टरांनी हात खांद्यापासून काढून टाकला. पीढीजात 40 एकर शेतात गवत आणि झाडं-झुडपं होती. अशावेळी अप्पा खचले नाहीत. हातात कुदळ घेतली..एका हाताचे चार हाथ केले

दुष्काळ पराभूत करण्यासाठी हा गडी 1972 पासून सात वर्षे गावच्या वेशीत शिरला नाही. हात गमावल्याची लाज मनात होतीच. हळूहळू अप्पांनी स्वहस्ते सगळीच्या सगळी जमिन वहिवाटीत आणली.
अप्पा शेतीला वळण देत होते. त्या काळात दर तीन-चार वर्षानंतर नापिकी व्हायची. घरची जबाबदारी वाढत होती. पण अप्पांची एकच जिद्द, काहीही झालं तरी शेतं सोडून जायचं नाही. आत्महत्येचा विचारही मनात येवू द्यायचा नाही.

45 वर्षात अप्पांनी 150 एकर शेती नेली. आपल्या बरोबर सालगड्यालाही 10 एकर जमीन घेवून दिली. बुलेट, ट्रॅक्टर, ट्रक, नव-नव्या ब्रँडची चार चाकी वाहने खरेदी केली. कंत्राटाची छोटी-मोठी कामे केली. शेतात देखणा बैलबारदाणा केला. या काळात अप्पांनी एकच पथ्य पाळलं. गावात चकाट्या पिटत बसायचं नाही. राजकारणात सहभाग नको. मित्रांनाही भेटायचं असेल तर शेतावरच्या घरी यायंच.
अप्पांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर सगळे दुष्काळ पराभूत केलेत. या वर्षीच्या दुष्काळातही अप्पांना साडेतीनशे पोती तूर..100 पोती सोयाबीन पिकवलंय. विहिरीच्या थोड्याशा पाण्याचा नेटका वापर करून पाच एकर डाळिंबाची बाग जोपासली आहे.

अप्पांची तीनही मुलं शिकली नाहीत..पण एक नातू इंजिनिअर..एक डॉक्टर आणि शिक्षक झाला आहे.
शेती आणि जिवनातल्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी पंचक्रोशीतले लोक महादेवअप्पाच्या घरी येतात. अप्पांनी कहाणी सांगणारी पत्रकं तयार करुन लोकांनी स्वत: पंचक्रोशीत वाटलीत.

खचलेल्या शेतकऱ्यांना आप्पा म्हणतात, ‘जर का तुम्हाला आत्महत्या करावी वाटली, तशी बुद्धी सुचली, तर मला येवून भेटा, तुमच्या शंकांचं निवारण करतो, अशी माझी खात्री आहे.’

 अप्पांना राज्य सरकारनं शेती निष्ठ पुरुस्कार दिला आहे. आपल्या अनुभवांवर अधारित अप्पांचा शेतक-यांना संदेश आहे. नापिकीमुळ आत्महत्या होत नाही. अधिर मन अवसानघात करतं, त्यामुळं आत्महत्येचा विचार जरी मनात आला तरी फक्त एकदा या एक हाताच्या माणसाच्या शेतावर या. तुमचे आत्महत्येचे विचार गळून पडतील.

सौजन्य-ए बी पी माझा
|| अन्नदाता सुखी भवः||

अधिक माहितीसाठी आपले फेसबूक पेज लाईक करा...

🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866